शहरं
Join us  
Trending Stories
1
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
2
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
3
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
4
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
5
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
6
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
7
आयआयटी बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
8
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
9
Astro Tips: तुमच्या हाताची ५ बोटं आहेत ५ ग्रहांचे प्रतिनिधी; कोणत्या बोटात अंगठी घालणे अधिक लाभदायी?
10
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
11
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
12
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
13
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
14
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
15
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
16
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
17
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
18
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
19
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
20
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
Daily Top 2Weekly Top 5

नदीकाठची संपूर्ण शेतजमीन झाली जिरायत... मिरज तालुक्यातील प्रकार : शेतकरी संघटनेकडून अजब प्रकार उजेडात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 27, 2018 21:11 IST

सांगली : नदीकाठच्या बागायत जमिनींची नोंद जिरायत करून शेतकºयांचे आर्थिक नुकसान करण्याचा प्रकार शेतकरी संघटनेमार्फत नुकताच उजेडात आला.

ठळक मुद्देकोणत्याही कायदेशीर प्रक्रिया पूर्ण झालेल्या नाहीतपाटबंधारे विभागास नुकसानभरपाईचा प्रस्ताव तयार करण्यास भाग पाडले

सांगली : नदीकाठच्या बागायत जमिनींची नोंद जिरायत करून शेतकºयांचे आर्थिक नुकसान करण्याचा प्रकार शेतकरी संघटनेमार्फत नुकताच उजेडात आला. संपूर्ण मिरज तालुक्यातील नदीकाठच्या सर्व गावांच्या जमिनींच्या सात-बाराला जिरायत नोंद झाली आहे. त्यामुळे आजवर शेतकºयांची यामाध्यमातून मोठी फसवणूक झाल्याचा प्रकार समोर आला आहे.

शेतकरी संघटनेचे नेते संजय कोले यांनी यासंदर्भात शनिवारी पत्रकार परिषदेत माहिती दिली. ते म्हणाले की, पूरसंरक्षक भिंत बांधण्यासाठी कसबे डिग्रज येथील शेतकरी अशोक रामू तोडकर व बाळासाहेब यशवंत पाटील या दोन शेतकºयांची अनुक्रमे ३८ गुंठे व १५ गुंठे कृष्णा नदीकाठची शेतजमीन २००७ मध्ये अधिग्रहित करण्यात आली. आजअखेर या दोन्ही शेतकºयांना त्याची नुकसानभरपाई मिळाली नव्हती. या शेतकºयांनी शेतकरी संघटनेकडे याबाबतचे गाºहाणे मांडले. त्यानंतर याबाबतचा पाठपुरावा करून पाटबंधारे विभागास नुकसानभरपाईचा प्रस्ताव तयार करण्यास भाग पाडले. मात्र पाटबंधारे विभागाने शेतजमिनीचे मूल्यांकन ५० टक्के कमी दाखविले.

मूल्यांकनाबाबत तहसीलदारांशी संपर्क साधून विचारणा करण्यात आल्यानंतर एक धक्कादायक प्रकार उजेडात आला. संपूर्ण मिरज तालुकाच आॅनलाईन सात-बारावर जिरायत झाल्याचे त्यांनी सांगितले. याबाबत अनेक अडचणी येत असल्याने पंधरा दिवसात याबाबतची दुरुस्ती होईल, असे आश्वासन दिले. याप्रकरणी सखोल चौकशी केली असता, पूरसंरक्षक भिंत बांधताना कोणत्याही कायदेशीर प्रक्रिया पूर्ण झालेल्या नाहीत. आजही संबंधित जमिनींच्या सात-बारा उताºयावर शेतकºयांचेच नाव दिसते. इतर हक्कांमध्येही कोणतीच नोंद नाही. तरीही शासकीय निधी खर्च करून मोठा गुन्हा करण्यात आला आहे. महाराष्टÑातील असे अनेक प्रकल्प जमिनी ताब्यात न घेता बेकायदेशीरपणे पूर्ण करण्यात आल्याचा आमचा दावा आहे. यावेळी कोले यांच्यासोबत सुनील फराटे, रावसाहेब दळवी, बाळासाहेब पाटील, आण्णासाहेब पाटील, अशोक चौगुले, अशोक तोडकर, वसंतराव भिसे, शंकर तपासे उपस्थित होते.

मुख्यमंत्र्यांकडे तक्रार करणारकोले म्हणाले की, यासदंर्भात पालकमंत्री सुभाष देशमुख यांच्याकडे आम्ही तक्रार केली आहे. लवकरच आम्ही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडेही तक्रार करुन संबंधितांवर कडक कारवाई करण्याची मागणी करणार आहोत. शेवटपर्यंत या प्रकरणाचा पाठपुरावा केल जाईल.

अन्यत्र शोधाशोधसांगली जिल्ह्यातील अन्य काही तालुक्यांमध्ये असे काही प्रकार झाले आहेत का, याचा शोध आता संघटनेमार्फत सुरू झाला आहे. त्याबाबतची माहिती संकलित केली जात आहे.

टॅग्स :WaterपाणीSangliसांगली